आता विश्वात्मके देवे l येणे वाग्यज्ञे तोषावे ll
तोषोनी मज द्यावे l पसायदान हे ll
जे खळांची व्यंकटी सांडो l तयां सत्कर्मी रति वाढो ll
भुतां परस्परे पडो l मैत्र जीवांचे ll
दुरितांचे तिमिर जावो l विश्व स्वधर्मसूर्ये पाहो l
जो जे वांच्छील तो ते लाहो l प्राणिजात ll
वर्षत सकळमंगळी l ईश्वरनिष्ठांची मांदियाळी l
अनवरत भूमंडळी l भेटतु भूतां ll
चला कल्पतरुंचे आरव l चेतना चिंतामणीचे गाव l
बोलते जे अर्णव l पीयुषांचे ll
चंद्रमे जे अलांच्छन l मार्तंड जे तापहीन ll
ते सर्वांही सदा सज्जन l सोयरे होतु ll
किंबहुना सर्वसुखी l पूर्ण होऊनी तिही लोकीं ll
भजि जो आदिपुरुखी l अखंडित ll
आणि ग्रंथोपजीविये l विषेशी लोकी इये l
दृष्टादृष्टविजये ll होआवे जी ll
येथ म्हणे श्रीविश्वेश्वराओ l आ होईल दान पसावो l
येणे वरे ज्ञानदेवो l सुखियां जाला ll
- श्री ज्ञानेश्वरमाऊली
पसायदानाबद्दल मी काय बोलू? माझी तेवढी झेप नाहीच! माझ्या मते पसायदानाची उंची ही केवळ अनुभवायची गोष्ट आहे. त्याची खोली हळूहळू समजू लागते. समजत आहे म्हणता म्हणता, हातातून कितीतरी संदर्भ निसटल्यासारखे वाटतात.
अत्यंत खडतर अश्या आयुष्याला सामोरं जाऊन, त्याला आपलंस करुन, त्या आयुष्याचं केवळ स्वतःपुरतंच नव्हे, तर येत्या कित्येक पिढ्यांसाठी लखलखणारं सोनं करुन ठेवलेल्या संतपुरुषाचे हे शब्द! इतक्या लहान वयात कुठून आली ही ऋजुता? इतके अन्याय सहन करुन एवढी कोवळीक कशी काय जपली ह्या माणसाने? म्हणून ज्ञानेश्वर ही माऊली का? जशी आईच्या मनात केवळ अपरंपार माया असते, तशीच सर्वांभूती जपलेली माया. विश्वाच्या आर्ताचे दु:ख जाणवणारं मन माउलीचंच असू शकत ना?
This entry was posted
on सोमवार, २० ऑक्टोबर, २००८
at सोमवार, ऑक्टोबर २०, २००८
and is filed under
कविता पानोपानी
. You can follow any responses to this entry through the
comments feed
.