आभाळ जिथे...  

Posted by यशोधरा in

आभाळ जिथे घन गरजे
ते गांव मनाशी निजले
अंधार भिजे धारांनी
घर एक शिवेवर पडले

अन पाणवठ्याच्या पाशी
खचलेला एकच वाडा
मोकाट कुणाचा तेथे
कधी हिंडत असतो घोडा

झाडातून दाट वडाच्या
कावळा कधीतरी उडतो
पारावर पडला साधू
हलकेच कुशीवर वळतो

गांवातील लोक शहाणे
कौलावर जीव पसरती
पाऊस परतण्याआधी
क्षितिजेच धुळीने मळती

- ग्रेस

This entry was posted on बुधवार, ५ नोव्हेंबर, २००८ at बुधवार, नोव्हेंबर ०५, २००८ and is filed under . You can follow any responses to this entry through the comments feed .

0 comments

टिप्पणी पोस्ट करा