भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो
तू मला शिकविली गीते
हे झरे चंद्रसजणांचे
ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण
झाडांत पुन्हा उगावाया
त्या वेली नाजूक भोळ्या
वारयाला हसवून पळती
क्षितिजांचे तोरण घेऊन
दारावर आली भरती
तो बोल मंद हळवासा
आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील
जणू अंगी राघव शेला
देऊळ पलिकडे तरीही
तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबुळापाशी
मी उरला सुरला थेंब
संध्येतील कमल फुलासम
मी नटलो श्रृंगाराने
देहाच्या भवती रिंगण
घालती निळाईत राने
स्तोत्रात इंद्रिये अवघी
गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही
चांदणे तुझ्या स्मरणाचे
ते धुके अवेळी होते
की परतायाची घाई
मेंदूतुन ढळली माझ्या
निष्पर्ण तरुंची राई
-कवि ग्रेस
This entry was posted
on मंगळवार, ३० डिसेंबर, २००८
at मंगळवार, डिसेंबर ३०, २००८
and is filed under
कविता पानोपानी
. You can follow any responses to this entry through the
comments feed
.
5 comments
मी सुजित. आपण ब्लॉग छान बनवलायेत. माझं कवी ग्रेस यांच्या कवितांचं कलेक्शन बघा.
http://marathikavitaa.blogspot.com/search/label/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8
१२ जानेवारी, २००९ रोजी ११:०८ AM
संग्रहातील सा-याच कविता सुंदर आहेत.
२९ जानेवारी, २००९ रोजी १२:०६ AM
kavita khupach chaan aahet...uttam...aani mitranno just try http://dhirajkumardarawdade.blogspot.com and stay connecting for a long time.Have a nice day always...Pratek shan an diwas sukhacha jawo...!
२० फेब्रुवारी, २००९ रोजी १:३६ PM