अंतरिक्ष फिरलो, पण
गेली न उदासी
गेली न उदासी!
लागले न हाताला
काही अविनाशी
काही अविनाशी!
क्षितीज तुझ्या चरणांचे
दिसते रे दूर
दिसते रे दूर!
घेऊन मी चालू कसा
भरलेला ऊर
भरलेला ऊर!
जरी वाटे जड कळाले
तळ कळला नाही
तळ कळला नाही!
जड म्हणते "माझा तू"
क्षितिज म्हणे, "नाही"
क्षितिज म्हणे, "नाही!"
अंतरिक्ष फिरलो, पण
गेली न उदासी
गेली न उदासी!
- म. म. देशपांडे
This entry was posted
on रविवार, ७ जून, २००९
at रविवार, जून ०७, २००९
and is filed under
कविता पानोपानी
. You can follow any responses to this entry through the
comments feed
.