मर्ढेकरांची कविता  

Posted by यशोधरा

किती पायी लागू तुझ्या
किती आठवूं गा तूंते;
किती शब्द बनवूं गा
अब्द अब्द मनी येते.

काय गा म्यां पामराने
खरडावी बाराखडी;
आणि बोलावी उत्तरें
टिनपाट वा चोमडी.

कधी लागेल गा नख
तुझे माझिया गळ्याला,
आणि सामर्थ्याचा स्वर
माझिया गा व्यंजनाला!

- बा. सी. मर्ढेकर

This entry was posted on शनिवार, १७ डिसेंबर, २०११ at शनिवार, डिसेंबर १७, २०११ . You can follow any responses to this entry through the comments feed .

0 comments

टिप्पणी पोस्ट करा