आभाळ जिथे घन गरजे
ते गांव मनाशी निजले
अंधार भिजे धारांनी
घर एक शिवेवर पडले
अन पाणवठ्याच्या पाशी
खचलेला एकच वाडा
मोकाट कुणाचा तेथे
कधी हिंडत असतो घोडा
झाडातून दाट वडाच्या
कावळा कधीतरी उडतो
पारावर पडला साधू
हलकेच कुशीवर वळतो
गांवातील लोक शहाणे
कौलावर जीव पसरती
पाऊस परतण्याआधी
क्षितिजेच धुळीने मळती
- ग्रेस
This entry was posted
on बुधवार, ५ नोव्हेंबर, २००८
at बुधवार, नोव्हेंबर ०५, २००८
and is filed under
कविता पानोपानी
. You can follow any responses to this entry through the
comments feed
.